'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 28 February 2016

या गाडीला ब्रेक नाही . . .

२०१६ च्या सीमोल्लंघनचा हा पहिला अंक. आज थोडा pause घेवून २०१५ अखेरच्या भारताचा एक snapshot घेवूया. लोकसंख्या, प्रदूषण, कचरा, उद्योगधंदे, रोजगार, शिक्षण वगैरे अनेक गोष्टींनी मिळून हा snapshot बनेल. त्यातील फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चे २०१५ चे चित्र थोडे जवळून पाहू.

मोबाईल आणि इंटरनेट संबंधी काही बोलकी आकडेवारी -

ट्राय (Telecom Regulatory Authority of India - TRAI) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३१ डिसेंबर, २०१५ रोजी भारतात-
·         टेलिफोनचे १०३. कोटी ग्राहक आहेत. (भारताची २०१५ अखेर अंदाजे लोकसंख्या - १३२ कोटी)
·         यात १०१ कोटी ग्राहक मोबाईलधारक, तर . कोटी ग्राहक लॅंडलाईनधारक आहेत. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे ७३ कोटी . कोटी होते.)
·         मोबाईलधारक ग्राहकांपैकी ४३ कोटी ग्रामीण, तर ५८ कोटी शहरी भारतातील आहेत. (भारताची ग्रामीण लोकसंख्या ~६८%)
·         दर १०० लोकसंख्येमागे असणा-या मोबाईलधारकांच्या एकूण संख्येला mobile teledensity म्हणतात. शहरी भारतात हा आकडा १४७ (एक व्यक्ती एकापेक्षा अधिक सिम कार्ड घेवू शकते), तर ग्रामीण भारतात हा आकडा ४९ आहे. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे १४१ ३० होते.)
               
                याचा अर्थ मोबाईलधारकांची संख्या वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागातील मोबाईलधारकांचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहे. स्मार्टफोनच्या कमी होणा-या किंमती मोबाईल वापराचे कमी होणारे दर यामुळे इंटरनेट त्यामार्फत ज्ञान ग्रामीण भारतात पोचण्याची संधी वाढली आहे. आता भारतातील इंटरनेटची काही आकडेवारी पाहू. (स्त्रोतInternet and Mobile Association of India - IAMAI).

·         डिसेंबर २०१५ अखेर भारतात जवळपास ४० कोटी इंटरनेटचे वापरकर्ते आहेत
·         इंटरनेटचे वापरकर्ते कोटीवरून १० कोटीपर्यंत पोचण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला. १० कोटीवरून २० कोटीपर्यंत पोचण्यासाठी वर्षे लागली. ३० कोटीवरून ४० कोटीपर्यंत पोचण्यासाठी केवळ वर्ष लागले.
·         डिसेंबर २०१५ अखेर भारतातील इंटरनेटचे तब्बल ३१ कोटी वापरकर्ते मोबाईल फोनवरून इंटरनेट वापरतात. (२२ कोटी - शहरी, कोटी - ग्रामीण) एका वर्षात हे प्रमाण शहरी भागात ७१ % नी तर ग्रामीण भागात ९३ % नी वाढले आहे.

                आपल्याला आवडो किंवा आवडो, मोबाईल इंटरनेट शहरात बहुतेक लोकसंख्येपर्यंत पोचले आहेत, खेड्यापाड्यात अगदी प्रचंड वेगाने पोचत आहेत. 3G मुळे मोबाईलमार्फत इंटरनेटचा वापर खूप सोपा झाला. 3G पासून 5G Internet of Things (मोबाईल फोनच नाही, तर सर्वच उपकरणे इंटरनेटद्वारे एकमेकांना कनेक्टेड असतील) पर्यंतचा मार्ग स्पष्टपणे आखला गेला आहे. मोठमोठ्या उद्योजकांनी यात गुंतवणूक सुरू केली आहे. या गाडीला ब्रेक नाही, रिव्हर्स गिअर नाही. समाजातील समस्या सोडवण्याची इच्छा असणा-या आपल्या सर्वांना या होत असलेल्या बदलाची जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीत त्यानुसार योग्य बदल करणे आवश्यक आहे.

निसरडा रस्ता -
                लहानपणी विटी-दांडू, गोट्या आपण जितक्या सहजपणे हाताळायचो, तितक्या सहजपणे आजची लहान मुले स्मार्टफोन, टॅब्लेट हाताळत आहेत. वयात येणा-या मुलामुलींना भरकटवण्याची खूप मोठी ताकद मोबाईल इंटरनेट मध्ये आहे. स्मार्टफोनच्या व्यसनाकरिता व्यसनमुक्ती केंद्रेही सुरू झाली आहेत.
                इंटरनेटचा वापर खूप वाढला असला तरी अजूनही तो न्याय्य योग्य नाही. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७१% पुरूष : २९% स्त्रिया असे प्रमाण आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ८८% पुरूष : १२% स्त्रिया इतके व्यस्त होते. ग्रामीण भागात करमणूक हेच इंटरनेट वापराचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर social networking संपर्कासाठी इंटरनेट वापरले जाते. ग्रामीण भागातील ७५% इंटरनेटचे वापरकर्ते १८-३० वयोगटातील आहेत. जर करमणूक हा इंटरनेटचा प्रमुख उपयोग असेल तर त्यापायी खूप मोठी तरूण क्रयशक्ती वाया जाण्याचा धोका संभवतो. माहितीसाठी ज्ञानासाठी इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेत ज्ञान सहजासहजी उपलब्ध नाही. इंटरनेटवरील जवळपास ५६% माहिती इंग्रजीत आहे, केवळ .% माहिती भारतीय भाषांमध्ये आहे.
               
अडचणींमध्ये लपलेल्या संधी -

                मात्र अडचणी कधीच एकट्या येत नाहीत. त्या आपल्यासोबत आव्हाने आणि संधी घेवून येतात. इंटरनेटवर भारतीय भाषांत माहिती व ज्ञाननिर्मितीची मोठी गरज व संधी आहे. करमणूकीसोबतच माहिती, ज्ञान व आपल्या समस्या सोडवण्यासाठी इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे आपण कार्यकर्त्यांना शिकून लोकांपर्यंत पोचवण्याची गरज व संधी आहे. सशक्तीकरणासाठी स्त्रियांपर्यंत इंटरनेट पोचवण्याची गरज व संधी आहे. तरूणांमध्ये इंटरनेट वापराचे आकर्षण दिसते, तसेच त्यांच्यात इंटरनेट वापराचे प्रमाणही मोठे आहे. त्यांच्यापर्यंत सामाजिक संदेश पोचवण्यासाठी एक आयता प्लॅटफॉर्म आपण काहीही न करता आपल्याकडे उपलब्ध आहे. ३१ डिसेंबरला दारूच्या मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. दारूचे संस्कृतीकरण होते. ३१ डिसेंबर, २०१५ ला नायनांनी तरूणांकडून दारूसंबंधी प्रश्न मागवून त्यांची शास्त्रशुद्ध उत्तरे दिली. सोशल मेडियामार्फत ही प्रश्नोत्तरी २ दिवसांत जवळपास ५० हजार लोकांपर्यंत पोचू शकली.
               
'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेअंतर्गत ऐन मे महिन्याच्या दुपारी जालन्यातल्या शेतात फिरून आम्ही पाणलोट क्षेत्राचे नियोजन करत होतो. शेताची लांबी रूंदी मोजायची होती. शेताच्या कोप-यातले एक झाड सोडले तर नजरेत दूरदूरपर्यंत सावलीसाठी झाडच नव्हते. आम्ही या झाडापासून सुरूवात केली. मेजरींग टेप घेवून आम्ही शेताच्या परीघावरून चालू लागलो. लांबी रूंदी मोजून पुन्हा झाडापर्यंत आम्ही पोचलो तेव्हा पाऊणएक तास उलटून गेला होता. पहिल्या शेतातच आम्ही थकून गेलो. झाडाखाली बसलेला आपला निर्माणचा मित्र अमोघ पांडे मोबाईलमध्ये काही तरी पाहत होता. तो काय करतोय हे सहज उत्सुकतेने पाहिलं. त्याच्या स्क्रीनवर गुगल मॅपच्या मदतीने याच शेताचा नकाशा होता. खाली स्केल होती. स्केलच्या मदतीने आम्ही लांबी रूंदी मोजली. पाऊण तासांच्या पायपीटीनंतर जितकी लांबी रूंदी आम्ही मोजली, जवळपास तितकीच झाडाखाली बसून पाऊण मिनिटात निघाली. इंजिनिअर असून हे सुचलं नाही म्हणून मी खजिल झालो.
                तर मोबाईल आणि इंटरनेटमुळे या अलिबाबाच्या गुहेत दडलेल्या problem solving च्या असंख्य शक्यता ख-या होऊ पाहत आहेत. पण मोबाईल आणि इंटरनेट ही साधने आहेत, साध्य नाहीत याचं भान आजपासूनच ठेवूयात. नाहीतर कासिमप्रमाणे आपण या फसव्या गुहेत शिरू खरे, पण problem solving साठी गरज पडल्यास बाहेर पडू शकणार नाही.
स्रोत: निखिल जोशी, josnikhil@gmail.com

No comments:

Post a Comment