'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 13 June 2013

दुर्गम भागातल्या मुलांना गावातल्या गावात पुस्तके!

श्रद्धा चोरगीचे ‘अक्षरभारती’सोबत काम सुरू
श्रद्धा चोरगीने (निर्माण ४) ‘अक्षरभारती’ या पुण्यातील संस्थेसोबत Project Coordinator म्हणून काम सुरू केले आहे. दुर्गम भागातील उपेक्षित वर्गाच्या ५-१५ वयोगटातील मुलांना वाचनाची आवड लागावी याकरिता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम अक्षरभारती करते. या उपक्रमांतर्गत मुलांच्या गावातच वाचनालय सुरू करण्यात येते. वाचनालयाखेरीज शास्त्रीय खेळण्यांची कार्यशाळा, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, संगणक प्रशिक्षण इ. उपक्रम अक्षरभारतीकडून राबवले जातात. या उपक्रमांसोबतच संस्थेकरिता निधी जमा करण्याच्या कामात श्रद्धा समन्वयक म्हणून काम पाहिल.
अधिक माहितीसाठी: http://www.aksharbharati.org/

No comments:

Post a Comment