'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 4 April 2013

निर्माणीच्या नजरेतून



छायाचित्र: प्रेरणा राउत


छायाचित्राबद्दल:
कोमकरखेड्यातील आरोग्यसेविका उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे बीपी मोजताना...
कोमकर घनदाट जंगलात वसलेले असून ग्रामीण रुग्णालयापासून ५३ किमी तर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून २५ किमी लांब आहे. या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही.
भारत आधीच न्यूमोनिया, हागवण, मलेरिया इ. साथीच्या रोगांपासून पीडित असताना हृदयविकार, लकवा, उच्च रक्तदाब, मधुमेह इ. असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. सध्या हे रोग भारतातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत असून ग्रामीण भागातही मृत्यूच्या एकूण कारणांमध्ये हे प्रमुख कारण आहेत. या रोगांसाठी आयुष्यभर उपचार घेण्याची गरज असते. संसाधने व आरोग्यसुविधांची कमतरता असणाऱ्या खेड्यांमध्ये या रोगांमुळे गरीबीची नवी लाट येईल अशी भीती व्यक्त होत आहे. आपण या लाटेला तोंड द्यायला तयार आहोत का? कोमकरसारख्या दुर्गम गावांत आरोग्यसेवा पोहोचणं खरंच कठीण आहे. गावागावातल्या आरोग्यसेवकांनी आजवर गरोदरपणा, लहान मुलांच्या गंभीर आजारांचे व्यवस्थापन यशस्वीरित्या केले आहे. असंसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी गावागावातले प्रशिक्षित आरोग्यसेवक हे उत्तर असू शकेल?

No comments:

Post a Comment