'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 9 March 2013

अटकेची पर्वा न करता, अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी धुळे गटाचा मोर्चा


२९ जानेवारीला नाशिकमधील एका १४ वर्षीय मुलीला धुळ्यातील कुंटणखान्यात डांबून ठेवल्याची घटना समोर आली. त्या अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, धुळ्यातील निर्माणच्या गटाने प्रतिभा शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारी २०१३ रोजी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी व एस.पीं.ना निवेदन सादर केले. ह्या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना त्वरित अटक केली, मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ताटीया याचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळे त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
ह्यावर पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता निर्माण गटाने ४ फेब्रुवारीला धरणे आंदोलन केले. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी १४ लोकांना अटक केली. ह्यात निर्माणचे संदीप देवरे, पूजा वारुळे, माधुरी मगर, जागृती बोरसे ह्यांचा समावेश होता. ह्या सर्वांवर कलम १६८, १६९ खाली गुन्हा नोंदवून त्यांना दीड तासाने सोडण्यात आले.
अटकेने घाबरून न जाता या गटाने प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानभवनात नीलम गोऱ्हेंची भेट घेतली व श्री. आर. आर. पाटील ह्यांना निवेदन सादर केले. यानंतर काही दिवसांतच धुळे पोलिसांनी २ आरोपींना अटक केली व फरारी विजय ताटीयावर १०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. तसेच धुळ्यातील महिला सुरक्षेबद्दल एक समिती स्थापन करून त्यात निर्माण सदस्यांचाही समावेश करण्याचे आश्वासन धुळे पोलिसांनी दिले. बलात्कार झालेल्या मुलीचा जबाब पोलिसांनी कलम १६४ अंतर्गत न्यायाधीशांसमोर लिहून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाचे काम सध्या निर्माण गट पुढे नेत असून त्यासाठी जिल्हाधिकारी व  महिला बालकल्याण विभागाशी चर्चा सुरु आहे. 

No comments:

Post a Comment